Posts

Showing posts from August, 2018

मूतखडा kidney stone

Image
काळ्या चिकण मातीच्या शेतात चिक्कार पाऊस पडल्यावर चिखल झाला व त्यावर कडक प्रखर असे ऊन पडल्यावर तो चिखल वाळला की एक प्रकारचा कडक, टणक दगडासारखा चिखल तयार होतो. त्याप्रमाणेच शरीरास खूप पीडा देणाया मुतखड्याची निर्मिती वृक्कांत (किडनीत) होत असते. कारणे: १) खूप थंड, खूप उष्ण, गोड, तिखट, कफवर्धक, पचावयास जड, तेलकट, तुपकट, चहा, टोमॅटो, तीळ, काजु, कोबी, खुप बियांचे वांगे, काकडी पालेभाज्या अशा पदार्थांचा जेवणात अतिरेक असणे. २) झोप, विश्रांति, कामाच्या वेळा यांच्याकरिता असलेले आरोग्याचे सामान्य नियम न पाळणे. शौचाचा व लघवीचा वेग अडविणे, विशेषतः लघवीस वेळेवर न जाणे. ४) चहा, विडी, तंबाखू, कोल्ड्रिंक, मद्यपान यांचे अधिक सेवन करणे ५) वेडीवाकडी आसने, अवघडून बसणे, कसरतीचे वा मेहनतीचे ताकदीपेक्षा अधिक श्रम. ६) डोकेदुखी वा अन्य वेदना शमविण्याकरिता वेदनाशामक ए. पी. सी. असलेल्या गोळ्या नियमाने बराच काळ घेणे. लक्षणे: १) वृक्क (किडनी), मूत्रवाहिनी, मूत्राशय, पाठ, कंबर, ओटीपोट या भागांत कळा मारणे, काही वेळेस त्या कळा असह्य होणे. २) लघवी अडखळत, थोडी थोडी व काही वेळेस दोनधारा असल...

मधुमेह diabetes

Image
मधुमेहासारख्या घोर विकारात,अनेकांच्या अॅलोपाथी सल्ल्याविरुद्ध जाऊन आयुर्वेद शास्त्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही कार्य केले.  कुपथ्य या सदराखाली, अनेक पदार्थाबरोबर अॅलोपॅथीच्या मधुमेह, ब्लड प्रेशर,थायराईड, कॅल्शियम, व्हिटॅमिन, पेनकिलर, वायसोलिन, दम्याचा पंप अशा विविध गोष्टी घ्यायला मनाई करतो.  त्यामुळे आयुर्वेदीय औषधे घेऊन बरे वाटते का हे बघता येते. आयुर्वेदाची चिकित्सा करावयाची, असे ठरविल्यावर चिकित्सा सुचते तशी आम्हाला सुचली. तसाच मार्ग सर्वांना सुचावा ही वैद्य भगवान धन्वंतरीचरणी प्रार्थना. मधुमेह हा एक छुपारुस्तम' आहे. शहरी व कृत्रिम राहणीचा हा विकार, शरीर केव्हा कुठपर्यंत पोखरत जाईल याची भल्याभल्यांना,वैद्यकीय क्षेत्रांतील जाणत्या वैद्य-डॉक्टरांना कल्पना येत नाही. मधुमेहाच्या व्यवहारातील सर्व परीक्षा नॉर्मल येत असूनही एकदम मधुमेह वाढतो; अर्धागाचा झटका येतो.  हृदयाचा विकार बळावतो.  एखादी मोठी जखम होऊन ती भरून येत नाही किंवा मृत्यू येतो. याचे कारण मधुमेहाचे स्वरूप समजावून घेऊन शरीराला योग्य ते टिकाऊ स्वरूपाचे बल देणारी औषधी योजना व पथ्यापथ्य दिल...

हृद्रोग heart disease

Image
यावरील उपचार म्हणजे गंमत नव्हे . परंतु स्वतःला या पासना दूर ठेवणे हे आपल्या हाती आहेच ! कारणे : १) अकाली, भूक नसताना अति खाणे २) अति स्निग्ध, थंड, जड, चमचमीत पदार्थ नेहमी खाणे. ३) अति व्यायाम, चिंता, शोक, धावपळ करणे. ४) वरचेवर मानसिक त्रास होणे. ५) मलमूत्र प्रवृत्तीस वेळेवर न जाणे. वेग आला असतानाही रोखून धरणे. ६) इतर विकारांसाठी किंवा स्वास्थ्यासाठी जुलाब किंवा उलटीच्या औषधांचा अति वापर करणे. ७) कृमींचा इतिहास असणे. ८) अति कष्ट करणे, अति जड ओझे उचलणे. ९) छातीवर मार लागणे. १०) इतर विकारांचा हृदयावर परिणाम होणे. ११) निरनिराळी व्यसने. लक्षणे : १) छातीत डाव्या बाजूस ठराविक ठिकाणी वरचेवर दुखणे, पायावर सायंकाळी सूज येणे. विश्रांती असल्यास सूज नसणे. २) धडधडणे, कपाळावर घाम येणे. ३) हातात चमका, मुंग्या येणे. ४) खूप घाम येणे, जीव घाबरा होणे, काही करू नयेसे वाटणे. ५) एकदम खूप थकवा येणे, पांडुता येणे. ६) चक्कर येणे, श्वासाला त्रास होणे, कानात आवाज येणे, ७) उलटी होणे, अंग काळे निळे होणे. ८) चढ चढणे, जिना चढणे, फार श्रम याने धाप लागणे. ९) झोप खंडित होणे, डोके ख...

कंडू itching खाज येणे

Image
कंडू या विकाराला लहान, वय, स्थळ, काळ यांचे काहीच बंधन नाही. अंगाला कंड सुटली असता त्याचेवर विजय मिळविणे फार अवघड काम आहे. ब-याच वेळा कामात असताना कंड सुटत नाही पण रिकामा वेळ फावला की तो रोग दुप्पट उसळी घेऊन त्रास देतो. कंड ही चोरपावलाने सावकाश येते. वेळेवर योग्य उपचार झाले तर लवकर जाते. नेमके कारण व त्याकरिता पथ्य पाळणे याची नितांत गरज असते. दीर्घकाळची कंड जावयास दीर्घकाळची औषधयोजना व मनोनिग्रह आवश्यक आहे. तात्कालिक कंड किंवा आगंतुक कंड बहुधा चटकन जाते. उदा. कावीळ, ताप, इत्यादि. मात्र मधुमेह, कुष्ठविकार,यातील कंड हे लक्षण बराच काळ मुक्काम करून राहते.  कंड का आग हे सांगण्यामध्ये रोगी घोटाळा करत असतो. तसेच रोग्याचे नेमके लक्षण समजून घेण्यामध्ये आम्हा वैद्य डॉक्टर लोकांचाही घोटाळा असू शकतो. कारणे: (कोरफड, काँग्रेस गवत, नदीकाठचे गवत यांची खाज, खाजरा सुरण कांदा, आळू यामुळे येणारी खाज, या विकारात कफ व पित्त या दोन दोषांचा संबंध असतो. बहुतांशी खाजेचा संबंध असलेले विकार कफप्रधान असतात. तुलनेने पित्ताचा भाग कमी असतो.) १) कफ या दोषाची फाजील वाढ होणे. २) कफाचे स्निग्ध, थंड,...

अर्धांगवात ( लकवा , paralysis , hemiplegia )

Image
ख-या अर्थाने दुर्बल, कार्यहीन, निकामी करणारा विकार, अर्धागवात येईपर्यंत तो टाळण्याकरिता बरेचसे करण्यासारखे असते. तो येऊन गेल्यावर पुन्हा दुसरा वा तिसरा आघात होऊ नये म्हणून कटाक्षाने प्रयत्न करावे लागतात. अर्धांगवाताची कारणे आपला प्रभाव दाखवितात व बोलणे, चालणे, हातापायाची हालचाल यांवर आक्रमण करतात. त्यामुळे परावलंबित्व, परस्वाधीनता, पांगळेपणा, दुबळेपणा,हळवेपणा या सर्वांचा रोगी धनी होतो. याकरिता चाळिशीचे आसपासच्या स्त्री-पुरुषांनी, विशेषत: स्थूल व्यक्तींनी आपली स्वत:ची व आपल्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे.  एकदा अर्धांगाचा आघात झाल्यावर कुटुंबातील लोकांच्या हातात फक्त 'सेवाकार्य' हाच उपाय उरतो. कारणे: १) रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र या सात धातूंची झीज होण्यास कारण होईल असे खाणे, पिणे वा वागणे. उदाहरणार्थ जेवणकमी व उशिरा करणे, कमी झोप घेणे, चिंता करणे इत्यादी. २) सात धातूंच्यापैकी काही धातूचे फाजील पोषण होईल असे खाणे,पिणे वा वागणे. त्यामुळे शरीरातील वहनसंस्थांच्या कामात अडथळा येतो. ३) ताकदीच्या बाहेर काम करणे, मनावर सतत आघात होणे, मनात ...

कंबर व गुडघेदुखी Back & Knee joint pain

Image
आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीची दोनही शास्त्रे एकमेकांना पूरक! या दोन्ही शास्त्रामुळे भारताची मान जगात ताठ राहिली आहे. अनेक विकारांचा यशस्वी सामना या दोन शास्त्रांच्या समन्वयाने होऊ शकतो. कंबर, पाठ, मान यांच्या सांध्यांच्या स्नायूंच्या व हाडांच्या विकारात औषधांबरोबरच योगासनांची फार मौलिक मदत होते हे आम्ही नेहमीच अनुभवतो. वयाच्या ठराविक मर्यादेनंतर कंबर दुखणे, गुडघे दुखणे, सांधे दुखणे अशा तक्रारी सामान्यपणे ब-याच स्त्री-पुरुषांना त्रास देतात. जसजशी माणसाची कृत्रिम राहणी वाढत जात आहे तसतसे या विकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. स्त्रियांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो.  त्यातल्या त्यात स्थूल, बुटक्या स्त्रियांना लवकर विकार जडतो. उठण्याबसण्याची सवय मोडणे, फाजील पिष्टमय आहार ; चुकीचे औषधे बारीकसारीक तक्रारींकरिता घेणे असे अनेक टाळता येण्यासारखे सोपे मुद्दे लक्षात घेतले जात नाहीत. तसेच लहानमोठ्या हाडांच्यामध्ये असलेल्या अतिकोमल चकत्यांवर किंवा वंगणावर फाजील ताण दिला जातो. त्यामुळे उद्भवणाऱ्या तक्रारींवर लगेच योग्य तो उपचार केला जात नाही व त्य...

चक्कर येणे Gidiness

Image
चक्कर येणे हा एक मोठे धोकादायक आहे. या लक्षणामुळे तो कधी कुठे पडेल त्याला लागेल किंवा हातपाय मोडेल? हे सांगता येत नसते. चक्कर येणे याचा अर्थ इथे पित्तामुळे किंवा मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा न झाल्यामुळे फेकल्यासारखे व गळल्यासारखे होणे, एवढा अर्थ घेतला आहे. फीटस् किंवा फेफरे यामुळे येणारी चक्कर या ब्लॉग मध्ये विचारात घेतलेली नाही. कारणे: १) मानेच्या मणक्यामधील अंतर कमी अधिक होणे. २) त्यामुळे त्यातील जाणाच्या रक्तवाहिन्या दबल्या जाऊन मेंदूला रक्तपुरवठा न होणे. ३) अति विचार, झोप कमी, पोषण कमी यामुळे रक्ताची उत्तमांगाला म्हणजे डोक्याकडे गरज वाढूनही प्रत्यक्षात रक्तपुरवठा मूळात कमी असणे. ४) रक्तदाबक्षय, खूप मोठी उशी घेणे, तीव्र ताप दीर्घकाळ राहणे. ५) शरीरात बनणाच्या आहाररसाचे प्रमाण कमी होणे, रसक्षय होणे. लक्षणे: १) डोलल्यासारखे वाटणे. २) तोल जाणे. ३) डोळे मिटून दोन्ही पाय जुळवून घेऊन आधाराशिवाय उभे राहिल्यास पडेल की काय असे वाटणे, त्यावेळेस डोळ्याच्या पापण्या फडफडणे. ४) फेकल्यासारखे होणे. ५) भान जाणे. ६) बसल्या बसल्या किंवा उठता बसता किंवा चालताना क्षणभर एकदम ‘ब्लँ...

अम्लपित्त Acidity

Image
शहरी जीवनातील राहणीमुळे बऱ्याच लोकांना होणारा हा विकार आहे. जेव्हा भूक असते तेव्हा जेवायचे नाही व जेव्हा भूक नसेल तेव्हा अवाजवी व पुनः पुन्हा खावयाचे. यामुळे अम्लपित्त विकार बळावेल यात नवल ते काय?  हा विकार बऱ्याच वेळा ‘अल्सर' विकाराची पहिली पायरी असते. मोठमोठ्या कंपन्यांचे डायरेक्टर,सतत काम करणारे एम्प्लॉयी यांना आपल्या आरोग्याकडे बघावयास वेळ नाही' अशी स्थिती असते. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा हा खात्रीचा विकार असतो. अम्लपित्त हा विकार म्हणून आपल्या शरीरात घर करायच्या अगोदर त्याची चाहूल लागलेली असते. छातीत जळजळ, पोटात गॅस धरणे, पोट फुगणे, तोंडाला पाणी सुटणे, क्वचित पोट दुखणे, पोट साफ नसणे, मलावरोध, डोकेदुखी, उलटीची भावना, दात आंबणे या छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले की अम्लपित्त विकाराचा शिक्का पक्का बसतो. कारणे १) खूप तिखट, आंबट, खारट पदार्थ खाणे, उदा. लोणचे, मिरची मसाले, चहा, अंडी, मांसाहार, करडई, अंबाडी, गूळ, काकवी. २) मद्यपान, धूम्रपान, तंबाखू, जागरण, उन्हात हिंडणे, ३) सर्दी, ताप, दमा, खोकला याकरिता फार तीव्र औषधे घेणे. ४) चिंता करणे;...

दाह Burning sensation

Image
दाह म्हणजे आग होणे (हात, पाय, सर्वांग) एका स्त्रीरुग्णाला नेहमी सर्वांगाची आग, उलटीची भावना व छातीत ठरावीक जागी जळजळ अशी लक्षणे होती. पोटदुखी, पोटफुगी व उलटीची भावना ही तीन लक्षणे असली तर लगेच उलटीचे औषध द्यावे असे आयुर्वेदशास्त्र सांगते. त्यात खाज व सर्वंगदाह ही दोन अधिक लक्षणे समाविष्ट करण्यात यावी,असो! हातापायाची किंवा सर्वांगाची आग होणे हा म्हटले तर साक्षात आगीशी खेळ आहे. या विकारात सुरुवात लहानशीच असते. दुर्लक्ष व गैरसमजुतीमुळे चुकीचे उपचार यामुळे हा विकार चटकन बरा होण्याऐवजी एकदम रौद्र स्वरूप धारण करतो. अग्नि शमवणे जसे सोपे तसे भडकल्यावर त्याला आवरणे अवघड आहे. हा पित्ताचा विकार असल्यामुळे जावयाच्या सन्मानाने व घृत सारख्या बादशाही औषधाने या रोगाचे निरसन करावे लागते. काही वेळेस महागातील महाग मोतीभस्मासारखी औषधे वापरावी लागली तरी ती कमीच पडतात. कारणे: १) खूप तिखट, आंबट, खारट, उष्ण, तीक्ष्ण गुणांचे पदार्थ अधिक प्रमाणात खाणे. २) सतत जागरण करणे, अधिक श्रम करणे, उन्हातान्हात कोणतेही संरक्षण न घेता दीर्घकाळ काम करणे, अनवाणी चालणे, डोक्यावर आच्छादन नसणे. ३) मिरच्...

आमवात rheumatoid arthritis

Image
याची सुरुवात चोर पावलाने हळूच होते. थंडी, गारठा, खूप पाऊस,अवघडून प्रवास अशा कोणत्यातरी कारणाने रोग एकदम शरीराचा एक एक भाग जखडावयास लागतो. चुकीच्या औषध योजनेमुळे आम या रोगाकडे दुर्लक्ष, उपचारांचा कंटाळा यामुळे हा रोग बळावतो व त्याला शरीरात घर करायला ; हात, पाय, गुडघे, कंबर, खांदा व सर्व शरीर मिळते. अॅस्प्रिन असलेल्या वेदनाशामक औषधांनी या रोगाचे रुपांतर अधिक दुर्धर अशा संधिवातात होण्यास वेळ लागत नाही. कारणे : १) अन्न अपक्क स्थितीत आमाशयांतून व पच्चमानाशयांतून पचनाचे पुरेसे संस्कार न होता पुढे जाणे हे प्रमुख कारण होय. २) आहाररसाबरोबर शरीरात फिरणारे रक्तही आमस्वरुपी(विषस्वरूपी) बनते. ३) अशा अवस्थेत गारठा, ओल, खूप थंडी, पावसात भिजणे, अवघडून बसणे यामुळे शरीरातील कोणताही सांधा वा भाग आमवाताने जखडला जातो. ४) शौचास साफ न होणे, अवरोध करणे या कारणांनी हा रोग बळावतो. ५) जड़ान्न, मेवामिठाई, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक, जेवणावर जेवण, फरसाण, शेव, भजी, चिवडा यांचा अतिरेक. ६) नेहमी बस वा रेल्वेच्या प्रवासात अवघडत बसावे लागणे. ७) दीर्घकाळ बारीक ताप येत राहणे. लक्षणे: १) संचारी वेदना...

मलावरोध constipation

Image
मलावरोध हा विकारच नव्हे, इथपासून तर हा सर्व विकारांचे मूळ आहे, विकार की विकारांचा मूळ! अशा दोन टोकाच्या भूमिका तज्ञांमध्ये दिसून येतात. प्राण्यांचे सहज निसर्गजीवन पाहिले; तर पहिला विचार बरोबर वाटतो. वैद्य डॉक्टरांकडे कॉन्स्टीपेशन, मलावष्टंभ, मलावरोध, खडा होणे, शौचास साफ न होणे, खूप वेळ लागणे, दोन दोन दिवस परसाकडे न होणे, संडासला जावेसे न वाटणे, जोर करावा लागणे, मलप्रवृत्ति चिकट असणे, आमांश, संडासला घाणवास मारणे, शौचाचे समाधान नसणे, जेवणानंतर संडासला जायची भावना होणे, ग्रहणी अशा नानाविध मलासंबंधीच्या तक्रारींकरिता रुग्णांची गर्दी असते. सद्य व सत्य परिस्थितीला सामोरे जावून, मलावरोधाची स्थूल कल्पना व पथ्यापथ्ये यांचा विचार या ब्लॉगपोस्ट मध्ये करीत आहोत. कारणे: १) वेळी अवेळी जेवणे. २) जेवणावर पुन्हा जेवण. ३) भूक नसताना जेवण. ४) भुकेचे वेळेस पाणी पिणे. ५) पचावयास जड, थंड, तेलकट, तुपकट, खूप गोड, खूप तिखट पदार्थ खाणे तसेच रुक्ष, शुष्क, खूप उष्ण पदार्थ खाणे. ६) गरजेपेक्षा खूप कमी जेवणे; कदन्न खाणे. ७) कारण नसताना लंघन करणे. वारंवार उपवास करणे. ८) तुरट पदार्थांचा अतिरेक. ९...

अग्निमांद्य indigestion

Image
आमचा मुलगा जेवत नाही.' ‘हिला भूक नाही.'' डॉक्टर, काहीतरी औषध द्या, ही जेवेल असे करा.' अशा तक्रारी घेऊन लहान मुलांचे आईवडील नित्य येत असतात. तसेच हा मुलगा कितीतरी खातो, पण अंगीच लागत नाही.' गेली कित्येक वर्षे मुलीचे वजन काही वाढत नाही. आहे तसेच आहे.' अशा तक्रारी घेऊन येणारे आईवडील रोज भेटतात. यांतील पहिला तक्रारींचा प्रकार सुसाध्य, दुसरा मात्र कष्टसाध्य असतो. या प्रकारची लहान मुले, मुली वा मोठी माणसे पाहिली, समोर आली की चिकित्सक मनाला चालना मिळते. अशा शेकडो रुग्णांनी आम्हाला, विचाराला व कृतीला खाद्य पुरवून ऋणांत ठेवले आहे. अग्निमांद्य म्हणजे भूक नसणे हा सामान्य माणसाचा दृष्टिकोण झाला. तो ढोबळ विचार झाला. शरीराने घेतलेल्या आहाराचे, रस, रक्त, मांस इत्यादी धातूंमध्ये रूपांतर जेव्हा होत नाही; तेव्हा अग्निमांद्य विकार म्हणता येईल. जराशी भूक मंद झाली म्हणजे अग्निमांद्य म्हणू नये. अग्नि हा पित्त या व्यापक शक्तीचा एक भाग आहे. मूळ शक्ती पित्त. शरीरात असलेल्या त्याच्या स्थानामुळे जाठराग्नि हा शब्द आलेला आहे. त्याचे मूळ काम पचन आहे. तो सतत जागता, पेटत...

श्री ब्रह्मांडनायक आयुर्वेदिय व पंचकर्म चिकित्सालय

Image
"Anywhere when a human being holds something else higher than his own personal well being suddenly that space is powerful and fantastic to be in" _Sadhguru,isha foundation आयुर्वेद हे शाश्वत शास्त्र आहे व त्याचा पदोपदी प्रत्यय आयुर्वेदप्रेमी आपल्या चिकित्सा प्रयत्नात घेत असतोच. आयुर्वेदाचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घेणे, औषधीकल्पांचा कार्यकारणभाव जाणून घेणे, सफल व दुष्परिणामरहीत चिकित्सा करणे व त्यायोगे केवळ एतद्देशीयांचेच नव्हे तर अखिल विश्वातील मानवांचे शारीर व मानस स्वास्थ्यरक्षण करणे हे सर्व निस्सम आयुर्वेद प्रेमींचे ध्येय ! स्वतः आयुर्वेदाचे महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्यापासून वैद्य विजय पवार हे आयुर्वेद ग्रंथांचे वाचक व चाहते! अनुभवाचे कण एकत्र आणावे व त्यांना सलग व एकसंध असे रुप द्यावे, व्याधिंच्या चिकित्सेरुपी मांडावे ही त्यांची कळकळीची इच्छा। अनेक वर्षांच्या ह्या इच्छेला एक साकार रुप आलं आहे. ||श्री ब्रह्मांडनायक आयुर्वेदिय व पंचकर्म चिकित्सालय|| ''माझ्या रोगावर आयुर्वेदात काही आहे का?' असा प्रश्न रोगी ...